Sunday 15 December 2013

महापुरुषांचे वर्गीकरण नको

                      आजपर्यंत  आपल्या महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले , अनेक महापुरुषांचे विचार या महाराष्ट्राच्या भूमीला लाभले मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो कि लोकमान्य टिळक असो किवा महात्मा फुले असो कि बाबासाहेब आंबेडकर असो किवा अण्णाभाऊ साठे ,आज असे अनेक महापुरुष या भूमीत होऊन गेले म्हणूनच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य समजले जायचे ,इतर अनेक राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचा विकासदर हा जास्त होता ,पण आज आपला महाराष्ट्र अनेक बाबतीत मागे पडतोय ,कारण येथे महापुरुषांच्या विचारांनाच कोंडल्या चाललाय आणि महापुरुषांच वर्गीकरण होता आहे.
                     आतापर्यंत  अनेक महापुरुष होऊन गेले त्यातले कोणी देशासाठी लढले ,तर कोणी समाज सुधारणेसाठी तर कोणी महिलांसाठी असे सर्व महामानव होऊन गेले म्हणूनच आजपर्यंत आपण एवढी प्रगती करू शकलो, पण आजकाल त्यांच्या अनुयायांनी तर त्यांन फक्त तेवढ्यापुरता मर्यादित केलेला आहे, महामानवांनी केलेले प्रयत्न हे त्या अनुसार योग्यच होते अथवा आपण त्याला म्हणू ते कालसापेक्ष होते हे विसरून अनेक जन म्हणजेच त्यांना मानणारे ,अनुयायी अथवा इंग्रजी मध्ये follower एकतर त्याचे अंधानुकरण  करायचे बघतात अथवा प्रसंगी उठसुठ इतर महापुरुषांना नवे ठेवत बसतात , आणि आपल्या महापुरुषांचे विचार तिथेच ते नेस्तनाबूत करत असतात 
खर तर स्वातंत्रपूर्व काळात आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीने आणि सामाजिक विषमतेने ग्रासला होता ,त्यामुळे त्या काळात राष्ट्रवादी विचारसरणी तसेच सामाजिक समता अश्या दोन्ही प्रकारच्या महापुरुषांची गरज होती, दोन्ही गोष्टी समांतर सुरु होत्या जर आपण उदाहरणच घ्यायचं झाल तर एका बाजूने टिळक हे देशासाठी लढत होते तर महात्मा फुले हे सामाजिक समतेसाठी  लढत होते म्हणून काही दोन महापुरुषात काही दुरावा निर्माण झाला नाही अथवा त्यांनी आज जसे त्यांचे अनुयायी एकमेकांवर चिखलफेक करतात तशी चिखलफेककधी केली उलट टिळक आणि आगरकर हे जेल मधून बाहेर आल्यावर महात्मा फुले यांनी त्यांचा सत्कार केल्याचे उदाहरण आहे , दुसरे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभ भाई पटेलांचे घेऊ अथवा गांधीचे घेऊया ,हे सर्व पुणे करार करून बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांचे प्राण वाचविल्याचे आपल्याला माहितच आहे
हे उदाहरण देण्यामागचा हेतू हाच होता कि आज इंग्रज जरी नसले आणि सामाजिक विषमता जरी कमी झाली असली तरी आज सुद्धा या विचारांची आपल्याला कुठेना कुठे गरज हि पडते .त्यामुळे महापुरुषांच होता असलेल्या वर्गीकरणाला कुठेतरी थांबवायलाच हवाय ,नाहीतर काही वर्षांनी शिवाजी महाराज ,बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले ,लोकमान्य टिळक यासारखे महापुरुष हे कोण्या एका विशिष्ट वर्गापर्यंत अथवा जातीपर्यंत मर्यादित राहतील , आपल्या थोर पूर्वजास विसरून जाऊन कोणतेही राष्ट्र उदयास आले नाही व येणार नाही असे जे म्हटल्या जाते ते एका अर्थ योग्यच म्हटल्या जाते ,त्यामुळे कुठेतरी हे महापुरुषांना मर्यादित करण अथा त्यांचं वर्गीकरण करण थांबायलाच हव ठेव्हाच आपण त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकू
जय हिंद , जय महाराष्ट्र
                                                                                                                                          प्रसाद पाचपांडे 

1 comment: