Friday 21 November 2014

BE फायनल इयर

karrox करून  करून  जीव  जातो  वैतागून ,
शेवटचा  तास   करतो  मी  मागे  झोपून ,
 जावा,डॉट नेट पण  आहेत सोबतीला
 वेळ  नाही  मिळत  सदया   कुठे  फिरायला  ...
GATE चे  बुक  पाहून  डोळे  येतात  भरून  ,
कधीतरी  वाटते  बुक  पाहावे  एकदा  उघडून .,
apticha   पण  वीचार  येतो  कधीतरी  मनात ,
PHP मात्र  आहे  तळ्यात  आणि  मळ्यात ...
घरी जाऊन   एकदा  प्रोग्राम  करायचं  म्हणतो ,
घरीगेल्यावर मात्र  pc प्रोब्लेम  देतो ..
pc ची  पण  आहे  आमच्या  मोठीच  गम्मत ,
चालू  केल्यावर  एकदा  होतो  restart  परत  परत ..
अशी  आहे  आमची  कहाणी
BE फायनल इयर ची जुबानी 

Wednesday 19 November 2014

जीवन

जीवन  म्हणजे  निळ्या  निळ्या  नभातील  टपोर  चंदन  असत
प्रेमामध्ये  पडत  जाणार  पाहिलं  पाऊल हे  जीवन  असते
नुकतच  जन्मणार  मुल  हे  जीवन  असते ,
काळी  मधून  उमलणार  फुल  हे  जीवन  असते .........

जीवन  म्हणजे   असतो  अमृताचा  झरा,
जे  जगण्या  करिता  येतात  असंख्य  तारे  आणि  तारका ,
जीवन  म्हणजे  कष्टाकार्याची  भाकरी ,
आई  ची  मुलाला  मिळणारी  प्रेमाची  सावली .............!!!

जीवन  हे  एक  सुंदर  रोपट असत
कुणीही  सोबत  नसाल  तरी  ते  जगायचं  असत
कुणीही  काही  मागितलं  तरी  ते  द्यायचं  असत
पण  दिलेलं  परत  हे  मागायचं  नसत ..............

असे  हे  आपल  जीवन  असत
ज्यात  कधीही  थांबायचं  नसत
थोडावेळ  विश्रांती  घेऊन
पुढच  पाऊल  हे  टाकायचाच  असत
            - प्रसाद पाचपांडे
            पुणे / अमरावती 

Thursday 4 September 2014

नेमेचि येतो पावसाळा!


दरवर्षी पाऊस येतो, पाऊस म्हटला कि लहान मुलांसाठी शाळेच्या सुट्या, तरुणांसाठी असणार ते रोमांटीक वातावरण,गरम गरम भजे असे काही असते, अनेक तरुणांना तर पाऊस पाहून आपल्या प्रेयसी साठी कविता पण सुचतात ,असे हे पावसाच वातावरण असते, मला अश्या या पावसाळ्यात सगळ्यात जास्त आठवण येते ती माझ्या आजीची ,दरवर्षी पावसाळा सुरु झाला कि आजीची काळजी सुरु व्हायची ,११ वी मध्ये गेल्यानंतर जवळपास माझा जुना raincoat खराब झाला होता आणि फाटला देखील होता, तसेच पावसाळा सुरु झाला होता, ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाच्या कॉलेज नियमित जाण्यामागे काहीतरी कारण असत त्याप्रमाणे माझ सुद्धा कारण होताच त्यातलं एक म्हणजे मी तसा काहीसा अभ्यासू पण होतो आणि मग कॉलेज वरून येतांना रोज भिजलेलो असायचो ,आजी मग रोज मी रेनकोट घ्यावा म्हणून मागे लागायची, तसेच रोज आईला म्हणायची कि दादासाठी रेनकोट घ्यावा लागेल,पण मी रोज दुर्लक्ष करायचो ,कारण मला पावसात भिजायला आवडायचं, हाच उपक्रम १२ वी मध्ये पण चालला आणि पुढे अभियांत्रिकी च्या 1st सेमिस्तेर ला सुद्धा जवळपास कॉलेज ला जाण्याचा कारण सारख असल्यामुळे तेव्हासुद्धा रोज जायचं आणि भिजून यायचो ,आणि आजी रोज रेनकोट बद्दल म्हणायची ,गाडी शेवटी ज्यादिवशी आजीची तब्येत जास्त झाली होती आणि आम्ही आजीला दवाखान्यात नेणार त्यासाठी मी आणि माझा मित्र राहुल भिजून आलो होतो ,तेव्हासुद्धा आजी आईला म्हणत होती कि "दादा पावसात ओला होतो आणि त्याचे पुस्तक खराब होतात त्यासाठी रेनकोट घेशील ".
आज इतक्या दिवसांनी असाच मी पाऊस आला कि भिजून जातो आणि आज सुद्धा मी रेनकोट घेतलेला नाही आहे , मग पावसोबत आजीच्या आठवणीमुळे भिजून गेलो कि,रस्त्याने नातवाला घेऊन जाणार्या एखाद्या आजीच्या छत्रीत हळूच जातो , मग ती आजी मला विचारते कि भिजला का रे भेट रेनकोट नाही का तुझ्याकडे?
- प्रसाद पाचपांडे अमरावती

Wednesday 11 June 2014

शिवराज्याभिषेक दिन

सोनियाचा दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला
स्वराज्याचे तोरण सजले
आज रयतेचे राज्य आले ------------ 1
व्यर्थ नव्हे ते बाजी तानाजी चे बलिदान
याच स्वराज्यासाठी ज्यांनी दिले अपुले प्राण
तोचि मंगल दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला ------२
जुलमी मुघलांचा त्रास ज्यांनी रोखला
स्त्रियांना येथे सन्मान दिधला
शेतकऱ्यांचा कैवारी बनुनी
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला ----२
वापर करुनिया गनिमी काव्याचा
पाडाव केला शत्रूंचा
रक्षण करुनिया सज्जनाचा
कर्दनकाळ बनला दुर्जनांचा -------३
होती सुरुवात शिवशकाची
वाजे तुतारी येथे शिवशाहीची
तोचि मंगल दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला------४
                 -  प्रसाद पाचपांडे

Monday 2 June 2014

अखंड सावधान असावे





काल आणि परवा फेसबुक वरील वादग्रस्त फोटो आणि मजकुरामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता ,ज्यांनी कोणी हा प्रकार केला तो मुळात निन्दनियच होता ,पण पोलिसांनी आणि जागरूक नागरिकांनी दाखवलेल्या जागरूक पणामुळे हा प्रकार कमी होण्यात मदत लाभली ,ह्या प्रकारची सुरुवात मुळात एका व्यक्तीचे फेसबुक पेज hack करून झाली ,आणि नंतर अफवांचे पेव उठले कुठे मस्जिद चे फोडलेले फोटो शेयर होता होते तर कुठे मुलाला मारलेला फोटो शहरे करत होते पण याही परिस्थितीत काही जागरूक नागरिक प्रसंगावधान ह्या अफवा खोडून काढत होते ,पण अश्या गोष्टी परत होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेण खूप गरजेची आहे, इथे आपल्या समर्थ रामदास स्वामींची ओळ जी आतापण आपल्या कामात येते " अखंड सावधान रे | प्रयोग प्रेत्न मात्र रे | प्रसंग हा तुफान रे | नकोचि वेवधान रे" ,त्यानुसार आज वागण खरच गरजेच आहे ,त्यामुळे पहिले तर आपण सोशिल मेडिया मधील सावाधान्तेबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया
१) कोणाची request स्वीकारतांना त्याची request स्वीकारण्याआधी त्याची प्रोफाइल एकदा तपासून पहा कि हे फेक account तर नाही .
२)अनेक जणांना पोस्त न वाचता ती like करण्याची सवय असते ,त्यामुळे कृपया आधी ती like करण्या आधी त्यात काही आक्षेपार्ह नाही ये बघूनच like करावी
३) बाहेर cyber कॅफे वर पासवर्ड रिमेम्बर करू नये
४) मुलींनी शक्यता आपला फोटो अपलोड करण्याच टाळावे
५) सहसा आपण स्वताच कुठे भडक comment देऊ नये
६) कोणत्याही व्यक्तीला एखाद्या पेज च अद्मीन बनवतांना तो आपल्या ओळखीतला बनवावा
७)कोणी आपल्याला अक्षेपार्या tag केल्यास ते रेमोवे करावे
८) आक्षेपार्ह फोटो whats अप्प वरून शहरे करू नये
ह्या गोष्टीची काळजी घेतल्यास असे प्रकार कमी होतील ,त्यामुळे समर्थांचे वाक्य लक्षात घेऊन फक्त फेसबुकच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा अखंड सावधान असावे जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात इतर ठिकाणी सुद्धा कामात येईल ,खरतर हे वाक्य समर्थ रामदास स्वामींनी संभाजी राजांना पाठवेल्या पत्रात त्यांनी लिहिले ,संभाजी राजांना असलेल्या स्वकीय तसेच परकीय शत्रूंचा धोका लक्षात घेत समर्थांनी त्यांना पत्र लिहिले होते पण त्यांचे हे उपदेश आज सुद्धा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे भाग बनून जातात
- प्रसाद पाचपांडे 

Thursday 16 January 2014

विज्ञाननिष्ठ सावरकर


विज्ञाननिष्ठ सावरकर :
स्वातंत्रवीर सावरकर म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर उभी राहती ती त्यांची ऐतिहासिक उडी , ते एक स्वतंत्र सैनिक , लेखक कवी म्हणून सर्वांना परिचित तर आहेच पण त्यासोबतच ते , विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते सुद्धा होते ,त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली.पण त्यासोबतच अंध श्रद्धे विरोधात असणारे त्यांचे विचार फार कमी लोकांना माहित आहे , सावरकरांचे असे हे विचार त्यांच्या खालील काही पुस्तकातून सहज दिसून येतात , खाली मी त्याची लिंक सुद्धा दिली आहे ज्यांना हवी असेल ते download पण करू शकता
१)जात्युच्छेदक निबंध
http://www.savarkar.org/content/pdfs/mr/jaytuchhedak-nibandh-kh6-mr-v003.pdf
२) अंधश्रद्धा निर्मूलन कथा भाग १ व २ http://www.savarkar.org/content/pdfs/mr/andhashradhha-nirmulan-katha-kh6-mr-v002.pdf
३)विज्ञाननिष्ठ निबंध भाग १ व २
http://www.savarkar.org/content/pdfs/mr/vidnyan-nistha-nibandh-kh6-mr-v002.pdf