Sunday 11 February 2018

प्रेम आणि भावना

आजकाल बरेच जन येथे प्रेमावर लिहितात तर अनेक लोकांना येथे सिम्पल सिम्पल हवी असे म्हणनारे सुद्धा बरेच् आहे
मी कॉलेज मधे असताना त्या काळी तरुणां मधे असणार प्रेम हे जगजीत सिंह यांच्या होश वालो को खबर नाही या गाण्या सारखा असायचं  आणि जो संपायचं  ते ' हम लबो से कह न पाये उनसे हाले दिल कभी और वे समझे नाही ये खामोशी क्या चीझ है' . आजकाल प्रेमाची व्याख्या बदलली आहे पहिल्या दिवशी भेट होते आणि दुसऱ्या दिवशी प्रोपोज़ तिसऱ्या दिवशी break up . पण पहिल्या दिवशी भेट झालेल्या माणसाला दुसऱ्या दिवशी प्रेम झाल यात प्रेम असत का? एका व्यक्ति ला जाणून घेण्याकरिता  किवा स्वभाव समजण्याकरिता कमित कमी 2-3 भेटी तरी आवश्यक असतात पण एका दिवसात किवा भेट न होता ही प्रेम होने हे शक्य आहे का कदाचित आजची पीढ़ी ही attraction  ला च प्रेम समजत असावी आणि त्यमागे गुरफटुन गेलि असावी
प्रेम ही एक नाजुक भावना असते जी हळूहळू फुलत जाते ,आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो त्याला आपण प्रेम व्यक्त करायची पण गरज नसते अनेक वेळा न सांगता देखील समोरच्या ला ते कळून चूकते रोज एकमेकांशि भांडणारे किवा 2 दिवस दूर गेले की त्याना दुरावा जाणवू लागतो आणि कळते ते प्रेम अगदी 2 प्रेम करणारे व्यक्ति एकमेकांसोबत रोज भांडणारे मात्र 4 चौघात आपल्या आवडत्या व्यक्ति मागे त्याचा बद्दल चांगलेच बोलताना दिसतात आणि हळुवार फुलत जाणार प्रेम हे आयुष्यभरासाठी असत अगदी
कुसुमाग्रज यांच्या खालील ओळी प्रमाणे असत:
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!
शब्दांकन 
प्रसाद पाचपांडे
अमरावती /नवी मुंबई