Showing posts with label सामाजिक लेख. Show all posts
Showing posts with label सामाजिक लेख. Show all posts

Wednesday, 24 June 2026

प्रणित मोरे शो तील अश्लीलतेवरून सोशल मीडियावर उठलेले वादळ

प्रणित मोरे खरच कॉमेडी नावाखाली अश्लीलता पसरवत आहे का? बिग बॉस गाजवल्यानंतर प्रणित मोरे नी त्याचा नवीन कॉमेडी शो सुरू केला आणि बिग बॉस मध्ये गेल्यानंतर त्याचा शो अर्थातच पॉप्युलर देखील झाला पण तिथे कॉमेडी पेक्षा जास्त अश्लील आणि कमरेखालच्या जोक्स मुळे अनेकदा टीका देखील झाली, आता नुकत्याच झालेल्या दोन घटनांमुळे प्रणित मोरेला त्याचा शो बंद करण्याचे आणि त्याचा अकाउंट deactivated करण्याची वेळ देखील आली, त्यातली पहिली घटना म्हणजे हिमांशू जांगडा नावाच्या मुलाने डेटिंग वरची गोष्ट सांगताना हे सांगितले की त्यांनी एका मुलीवर कशाप्रकारे 370 रुपये खर्च केले आणि ते खर्च केलेले पैसे रिटर्न घेण्यासाठी त्याने तिच्या फिजिकल रिलेशन केले होते किंवा खोटी पण त्याने गेलेले वाक्य चुकीचं होतं आणि त्याच्यासाठी त्याच्यावर भरपूर टीका झाली अगदीच त्याच्यामुळे अनेकांनी पुरुषांवर देखील टीका केली हे सर्वच मुलं वाईट आहे यापासून टीका झाली आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन त्याच्यावर त्याचा जॉब देखील गेला.

पण याहीपेक्षा वाईट गोष्ट यापुढे आहे सेजल पवार नावाची मुलगी जेव्हा मिळालेल्या डेथ बॉडी बद्दल बोलली त्यांच्या गुप्तांगाबद्दल बोलली त्यावरून देखील टीका सुरू आहे कारण जेव्हा कोणी आपल्या परिवारातील व्यक्तीचे डेड बॉडी दान देतो किंवा शरीर दान देतो तेव्हा ते इमोशनल होऊन देता कारण ती फक्त एक मृता शरीर नसते तर त्यामागे असतात भावना आणि यामुळेच दान देणाऱ्या व्यक्तींच्या भावना देखील दुखल्या आहेत, पुढे जाऊन तिने याबद्दल माफी देखील मागितली आहे, सेजल आणि हिमांशू हे दोघं दोषी तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त दोषी हा प्रणित मोरे आहे तो यांना असे बोलायला provoke करतो, एखाद्याने एखादी गोष्ट करण्यापेक्षा कधीकधी त्या व्यक्तीला provoke करणारा देखील जास्त गुन्हेगार असतो, कदाचित त्यामुळेच आजचे शो फॅमिली पाहण्यासारखे नसतात, कार्यकारी टीव्ही वरची आणि कॉमेडी शो कपिल शर्मा सुनील पाल ते जॉनी लिव्हर अशा लोकांनी गाजवले आणि ते घरोघरी फॅमिली सहित देखील बघितले जायचे पण आता यामुळे खरंच कॉमेडी शो चा दर्जा खालावला आहे का हा प्रश्न पडतो, जर डॉक्टरच अशा असंवेदनशील असेल किंवा त्यांनी केलं असेल किंवा नसेलही पण असा संदेश मात्र या कॉमेडी शो च्या माध्यमातून लोकांमध्ये जातो,
तुमचं काय मत आहे असे शो असावेत की अशा शो मुळे कॉमेडीचा दर्जा घसरतोय??

Friday, 19 June 2020

मानसिक तणाव, आत्महत्या आणि जीवन


राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग च्या रिपोर्ट नुसार भारतात प्रत्येक दिवशी २८ लोक आत्महत्या करतात, २०१८ ला १०००० लोकांनी आत्महत्या केली तर २०१७ ला ९९०५ लोकांनी जीव दिला ( द हिंदू यांच्या बातमीनुसार), पण आपल्या सर्वसामान्य लोकांचा या घटनेकडे लक्ष तेव्हाच जाते जेव्हा सुशांत सारखा सेलेब्रेटी आपण गमावतो आणि नंतर सुरु होतात लोकांचे मोठमोठाले लेख अरे कोणाला तरी कॉल करायचा होता पासून कोणाला मोकळं बोलायचे असेल तर माझ्याशी बोलत जा इथपर्यंतची दिखावे आणि तिथून पुढे ३,४ दिवस हे पोस्ट वगैरे चालतात पण बंद होता मग परत आपण एखादा सुशांत, भैयूज्जी महाराज, पायल तडवी असो कि सागर चिंता (माझ्या जवळचा मित्र मुंबईचा ) होण्याची वाट पाहत बसतो.

sushant


तुमच्या जवळचा एक मित्र असतो, जो कंपनीत जेवताना पासून प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत असतो, कंपनी सोडल्यावर सुद्धा दुसऱ्या गावाला जाताना तो तुम्हाला सांगून जातो आणि कंपनी सोडल्यावर अचानक एक दिवस दुसर्याकडून तुम्हाला त्याच्याविषयी कळते आणि समोरची व्यक्ती सामान्य कुठूम्बातील असल्यामुळे नाही त्यांच्या जाण्यानी कोणी त्यांनी का केलं असा विचार करत किंवा कोणी दुखी होता नाही कारण ती व्यक्ती एका सामान्य कुटुंबातील असते आणि भारतात सरासरी रोज अश्या २८ घटना घडतात.





पुण्यात एकाच कुटुंबातील ४ लोकांनी आत्महत्या केली पण त्याबद्दल समाजात कुठेच काही प्रतिक्रिया उमटली नाही, किंवा कोणालाही बोलावसं वाटलं तर माझ्याशी बोला म्हणणारे तत्सम लोक कुठेच नव्हते, सांगायचं तात्पर्य एवढाच कि अश्यावेळी कोणीही त्या व्यक्तीला साथ देत नाही याउलट एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल तर त्याला निग्लेक्ट किंवा टार्गेट करण्याकडेच लोकांचा काल जास्त पाहायला मिळतो, या गोष्टीची सुरुवात शाळेपासून देखील होते एखादा मुलगा नाराज किंवा डिप्रेस दिसत असेल तर अनेकवेळा शिक्षकच त्याच कारण जाणून न घेता त्यांच्यावर वर्गात अजून अजून मस्करी करून त्याला चेष्टेचा विषय बनवतात किंवा एखादा मुलगा मुलगी जर थोडी दबावात राहत असेल तर त्या व्यक्तीची मेंटल torching किंवा harassment केल्या जाते आणि मग त्या व्यक्तीच जगन असह्य होते अगदीच याचा परिणाम त्या व्यक्तीचा अभ्यास आणि इतर गोष्टीवर होते, आणि समूहानेमिळून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे सोपे जाते त्यामुळे इतर लोक सुद्धा अश्यावेळी त्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा पाहतात.

भारतात तरुणाच्या आत्महत्या, मानसिक आरोग्य हा पुढे वाढत जाणारा एक गंभीर प्रश्न आहे त्यामुळे शिक्षणात जेव्हा मुलगा ८ वि अथवा ९ वि मध्ये जातो तेव्हा त्यांना मानसशास्त्र नावाचा एक विषय ठेवण्याची गरज आहे जेणेकरून मुलांचं प्रबोधन होईल आणि ते कोणाचं मानसिक शोषण अथवा त्यांचं कोणीही मानसिक शोषण करू शकणार नाही, पण या सोबतच गरज आहे पालकांनी आपल्या पाल्याना मानसिक दृष्टीनं खंबीर बनवण्यासोबतच त्यांना चांगली शिकवण देण्याची जेणेकरून ते या गोष्टीला बळी पडू नये आणि त्यांच्यामुळे सुद्धा कोणी या प्रकारचं पाऊल उचलू नाही.
आयुष्य हे एकदाच मिळत एकाद्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होता असेल तर ती गोष्ट सोडून द्या पण असे पर्याय उचलू नका 

:- प्रसाद पाचपांडे
   अमरावती