Wednesday 11 June 2014

शिवराज्याभिषेक दिन

सोनियाचा दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला
स्वराज्याचे तोरण सजले
आज रयतेचे राज्य आले ------------ 1
व्यर्थ नव्हे ते बाजी तानाजी चे बलिदान
याच स्वराज्यासाठी ज्यांनी दिले अपुले प्राण
तोचि मंगल दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला ------२
जुलमी मुघलांचा त्रास ज्यांनी रोखला
स्त्रियांना येथे सन्मान दिधला
शेतकऱ्यांचा कैवारी बनुनी
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला ----२
वापर करुनिया गनिमी काव्याचा
पाडाव केला शत्रूंचा
रक्षण करुनिया सज्जनाचा
कर्दनकाळ बनला दुर्जनांचा -------३
होती सुरुवात शिवशकाची
वाजे तुतारी येथे शिवशाहीची
तोचि मंगल दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला------४
                 -  प्रसाद पाचपांडे

Monday 2 June 2014

अखंड सावधान असावे





काल आणि परवा फेसबुक वरील वादग्रस्त फोटो आणि मजकुरामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता ,ज्यांनी कोणी हा प्रकार केला तो मुळात निन्दनियच होता ,पण पोलिसांनी आणि जागरूक नागरिकांनी दाखवलेल्या जागरूक पणामुळे हा प्रकार कमी होण्यात मदत लाभली ,ह्या प्रकारची सुरुवात मुळात एका व्यक्तीचे फेसबुक पेज hack करून झाली ,आणि नंतर अफवांचे पेव उठले कुठे मस्जिद चे फोडलेले फोटो शेयर होता होते तर कुठे मुलाला मारलेला फोटो शहरे करत होते पण याही परिस्थितीत काही जागरूक नागरिक प्रसंगावधान ह्या अफवा खोडून काढत होते ,पण अश्या गोष्टी परत होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेण खूप गरजेची आहे, इथे आपल्या समर्थ रामदास स्वामींची ओळ जी आतापण आपल्या कामात येते " अखंड सावधान रे | प्रयोग प्रेत्न मात्र रे | प्रसंग हा तुफान रे | नकोचि वेवधान रे" ,त्यानुसार आज वागण खरच गरजेच आहे ,त्यामुळे पहिले तर आपण सोशिल मेडिया मधील सावाधान्तेबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया
१) कोणाची request स्वीकारतांना त्याची request स्वीकारण्याआधी त्याची प्रोफाइल एकदा तपासून पहा कि हे फेक account तर नाही .
२)अनेक जणांना पोस्त न वाचता ती like करण्याची सवय असते ,त्यामुळे कृपया आधी ती like करण्या आधी त्यात काही आक्षेपार्ह नाही ये बघूनच like करावी
३) बाहेर cyber कॅफे वर पासवर्ड रिमेम्बर करू नये
४) मुलींनी शक्यता आपला फोटो अपलोड करण्याच टाळावे
५) सहसा आपण स्वताच कुठे भडक comment देऊ नये
६) कोणत्याही व्यक्तीला एखाद्या पेज च अद्मीन बनवतांना तो आपल्या ओळखीतला बनवावा
७)कोणी आपल्याला अक्षेपार्या tag केल्यास ते रेमोवे करावे
८) आक्षेपार्ह फोटो whats अप्प वरून शहरे करू नये
ह्या गोष्टीची काळजी घेतल्यास असे प्रकार कमी होतील ,त्यामुळे समर्थांचे वाक्य लक्षात घेऊन फक्त फेसबुकच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा अखंड सावधान असावे जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात इतर ठिकाणी सुद्धा कामात येईल ,खरतर हे वाक्य समर्थ रामदास स्वामींनी संभाजी राजांना पाठवेल्या पत्रात त्यांनी लिहिले ,संभाजी राजांना असलेल्या स्वकीय तसेच परकीय शत्रूंचा धोका लक्षात घेत समर्थांनी त्यांना पत्र लिहिले होते पण त्यांचे हे उपदेश आज सुद्धा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे भाग बनून जातात
- प्रसाद पाचपांडे