Friday 31 July 2020

लोकशाहिरांच्या साहित्यातले लोकमान्य

 १ ऑगस्ट २०२०, महाराष्ट्राच्या साहित्यासाठी आणि इतिहासासाठी आजचा दिवस खूप वेगळा आहे , आज लोकमान्य टिळक यांची १०० वि पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०० वीजयंती, एक पत्रकार जहाल लेखक, गणितज्ञ, प्रखर राष्ट्रवादी, इंग्रजांनी ज्यांना भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख केला असे लोकमान्य तर दुसरे साहित्यरत्न लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलन मध्ये ज्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले असे अण्णा भाऊ साठे, एकाची जयंती तर एकाची पुण्यतिथी.



लोकमान्य टिळकांनी गीतेचा सार असणारा गीतारहस्य नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला तर अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा नावाची कादंबरी लिहिली.अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या ३ कवितांमध्ये लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केलाय

१) गण हा काव्यप्रकार
२) महाराष्ट्राची परंपरा
३) मुंबईचा गिरणी कामगार

याच निमित्याने अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचा गण या काव्यप्रकारात लोकमान्य टिळकांबद्दल त्यांचं महत्व सांगणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहे त्या या निमित्याने बघू या :-

प्रथम मायभूचा चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनी गातो कवणा ||धृ ||
स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना
लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना
कठीण काळी राष्ट्रनौकाना
मार्ग दाखविला तयाना
देशा दिली ज्यांनी प्रेरणा ||१||
- अण्णा भाऊ साठे

वरील गण या काव्यप्रकारात अण्णा भाऊ साठे सर्वात पहिले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीशिवछत्रपती यांचं स्मरण करून प्रथम मायभू चा चरणा,छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवणा म्हणजेच सर्वात पहिले मी माझी मायभूमी आणि छत्रपतींच्या शिवराय याना वंदन करतो आणि त्यांना स्मरण करून खालील गण सादर करतो .

त्यापुढील कडव्यात ते लोकमान्यांबद्दल लिहितात "स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना

लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना " कि मी छंत्रपती शिवरायांनंतर अश्या व्यक्तीला स्मरण करतो ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून सर्वसामान्य लोकांना जागे केले जेणेकरून येथील लोक हे इंगरांविरोधात स्वराज्यासाठी एकत्र येतील, पुढे ते लिहितात कि "कठीण काळी राष्ट्रनौकाना, मार्ग दाखविला तयाना " या देशात जेव्हा इंग्रजविरोधात कठीण काळ होता दडपशाही होती तेव्हा येथील राष्ट्रनौकाना म्हणजेच सर्वसामान्य लोकांना स्वराज्य हा मार्ग लोकमान्य टिळक यांनी दाखविला आणि देशाला इंग्रजनविरोधात लढण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली अशा लोकमान्य टिळक याना मी वंदन करतो, हे आहेत लोकशाहीर म्हणवल्या जाणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे लोकमान्य टिळक यांचा बद्दल चे शब्द, आज आपण सर्व महापुरुषांची विभागणी करतो अश्या वेळी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली हि गण कविता बराच काही सांगून जाते, जिथे आज फक्त जात पाहून महापुरुषांची जयंती साजरी केल्या अश्या आजचा महाराष्ट्राला आज या दोन्ही महापुरुषांची गरज आहे.

दुसरी कविता आहे मुंबईचा गिरणीकामगार त्यात त्यांनी लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर जी स्तिथी झाली त्याविषयी अण्णा भाऊ साठे यांनी वर्णन केलाय ते बघूया:-

सन एकोणीसशे आठ साली | इंग्रजांनी भली | अटक बघा केली | टिळकांना कारागृहीं नेले

मुंबईचा कामगार खवळे | निषेध संपाचे वादळ उठले | हिंदच्या मुक्तीचे भले ||

यामध्ये १९०८ साली लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर मुंबईचे गिरणी कसे खवळले आणि पुढे संप पुकारून त्यांनी निषेध व्यक्त केला हे सांगितलं आहे.

अण्णाभाऊ तिसऱ्यांदा एका पोवाड्यात लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला आहे

पोवाड्याचा नाव आहे :- महाराष्ट्राची परंपरा, त्यात ते खालील प्रकारे उल्लेख करतात

टिळकांनी घालून साद सिंह उठवला

उन्मत्त गोऱ्या गजाला, निर्भय इशारा दिला||

पळ काळे कर लवलाही केसरी आला’ ॥

यात अण्णा भाऊ साठे टिळकांना सिंह म्हणतात आणि त्यांनी इंग्रजांना ना भिता केसरी मधून जे लेख लिहायचे त्याचा उल्लेख अण्णाभाऊ यांनी केलाय, अण्णाभाऊ यांचा काळ वेगळा, दृष्टिकोन वेगळा तरीही ते लोकमान्य टिळकांचा त्यांनी आपल्या कवितांमध्ये अश्या प्रकारे उल्लेख केलाय , माणूस कितीही मोठा झाला तरी इतर व्यक्तींबद्दल असलेला आदरभाव च अण्णाभाऊ साठे यांच्या वरील कवितांमध्ये दिसून येतो, आज यांचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती तर लोकमान्य टिळक यांची १०० वी पुण्यतिथी त्यानिमित्यानी अण्णा भाऊ साठे यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल लिहिलेय या ओळी, दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन


प्रसाद पाचपांडे

अमरावती 

Friday 19 June 2020

मानसिक तणाव, आत्महत्या आणि जीवन


राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग च्या रिपोर्ट नुसार भारतात प्रत्येक दिवशी २८ लोक आत्महत्या करतात, २०१८ ला १०००० लोकांनी आत्महत्या केली तर २०१७ ला ९९०५ लोकांनी जीव दिला ( द हिंदू यांच्या बातमीनुसार), पण आपल्या सर्वसामान्य लोकांचा या घटनेकडे लक्ष तेव्हाच जाते जेव्हा सुशांत सारखा सेलेब्रेटी आपण गमावतो आणि नंतर सुरु होतात लोकांचे मोठमोठाले लेख अरे कोणाला तरी कॉल करायचा होता पासून कोणाला मोकळं बोलायचे असेल तर माझ्याशी बोलत जा इथपर्यंतची दिखावे आणि तिथून पुढे ३,४ दिवस हे पोस्ट वगैरे चालतात पण बंद होता मग परत आपण एखादा सुशांत, भैयूज्जी महाराज, पायल तडवी असो कि सागर चिंता (माझ्या जवळचा मित्र मुंबईचा ) होण्याची वाट पाहत बसतो.

sushant


तुमच्या जवळचा एक मित्र असतो, जो कंपनीत जेवताना पासून प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत असतो, कंपनी सोडल्यावर सुद्धा दुसऱ्या गावाला जाताना तो तुम्हाला सांगून जातो आणि कंपनी सोडल्यावर अचानक एक दिवस दुसर्याकडून तुम्हाला त्याच्याविषयी कळते आणि समोरची व्यक्ती सामान्य कुठूम्बातील असल्यामुळे नाही त्यांच्या जाण्यानी कोणी त्यांनी का केलं असा विचार करत किंवा कोणी दुखी होता नाही कारण ती व्यक्ती एका सामान्य कुटुंबातील असते आणि भारतात सरासरी रोज अश्या २८ घटना घडतात.





पुण्यात एकाच कुटुंबातील ४ लोकांनी आत्महत्या केली पण त्याबद्दल समाजात कुठेच काही प्रतिक्रिया उमटली नाही, किंवा कोणालाही बोलावसं वाटलं तर माझ्याशी बोला म्हणणारे तत्सम लोक कुठेच नव्हते, सांगायचं तात्पर्य एवढाच कि अश्यावेळी कोणीही त्या व्यक्तीला साथ देत नाही याउलट एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल तर त्याला निग्लेक्ट किंवा टार्गेट करण्याकडेच लोकांचा काल जास्त पाहायला मिळतो, या गोष्टीची सुरुवात शाळेपासून देखील होते एखादा मुलगा नाराज किंवा डिप्रेस दिसत असेल तर अनेकवेळा शिक्षकच त्याच कारण जाणून न घेता त्यांच्यावर वर्गात अजून अजून मस्करी करून त्याला चेष्टेचा विषय बनवतात किंवा एखादा मुलगा मुलगी जर थोडी दबावात राहत असेल तर त्या व्यक्तीची मेंटल torching किंवा harassment केल्या जाते आणि मग त्या व्यक्तीच जगन असह्य होते अगदीच याचा परिणाम त्या व्यक्तीचा अभ्यास आणि इतर गोष्टीवर होते, आणि समूहानेमिळून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे सोपे जाते त्यामुळे इतर लोक सुद्धा अश्यावेळी त्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा पाहतात.

भारतात तरुणाच्या आत्महत्या, मानसिक आरोग्य हा पुढे वाढत जाणारा एक गंभीर प्रश्न आहे त्यामुळे शिक्षणात जेव्हा मुलगा ८ वि अथवा ९ वि मध्ये जातो तेव्हा त्यांना मानसशास्त्र नावाचा एक विषय ठेवण्याची गरज आहे जेणेकरून मुलांचं प्रबोधन होईल आणि ते कोणाचं मानसिक शोषण अथवा त्यांचं कोणीही मानसिक शोषण करू शकणार नाही, पण या सोबतच गरज आहे पालकांनी आपल्या पाल्याना मानसिक दृष्टीनं खंबीर बनवण्यासोबतच त्यांना चांगली शिकवण देण्याची जेणेकरून ते या गोष्टीला बळी पडू नये आणि त्यांच्यामुळे सुद्धा कोणी या प्रकारचं पाऊल उचलू नाही.
आयुष्य हे एकदाच मिळत एकाद्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होता असेल तर ती गोष्ट सोडून द्या पण असे पर्याय उचलू नका 

:- प्रसाद पाचपांडे
   अमरावती