Sunday 20 November 2016

तुळशी चे लग्न


कधी काळच्या घराना
एक छोटे से आंगन असायचे
त्या छोट्याशा अंगनात
एक तुळशी वृंदावन असायचे
मग यायची दिवाळी
ज्याची सर्व आपुलकी नी वाट बघायचे
दिवाळी नंतर तुळशी चे लग्न असायचे
तुळशी च्या लग्ना साठी
शेजारी नातेवाईक एकत्र यायचे
त्या निमित्य फ़राळ व्हायचं
गोड़ धोढ़ व्हायच
मजा मस्करी व्हायची
लोकांमधल प्रेम जपल जायच
आता सर्वांच स्टैंडर्ड वाढल
स्टैंडर्ड वाढला म्हणुन
रहण देखील बदलल
घरा मधली लोक आता
अपार्टमेंट मधे राहायला लागली
पण आता त्या अपार्टमेंट मधे
माये ची लोक येत जात नाही
कारण घराला नसते आंगन
अंगनात नसते तुळस
आणि होत नाही तिथे
तुळशी चे लग्न
- कवि प्रसाद पाचपांडे

Saturday 13 August 2016

कोणी सांगेल का तिला

कोणी सांगेल का तिला
कधी कळेल का तिला
तिच्या हृदयात थोड़ी जागा 
देईल का ती मला
अंतरीचे बोल 
कधी कळेल का तिला
मनातील भावना
उमगेल का तिला
कोणी सांगेल का तिला
कधी कळेल का तिला
शब्दचे अर्थ कळतील
का तिला
चेहर्यवरील हसु
बनेल का ती माझ्या
कधी कळेल का तिला
कोणी सांगेल का तिला
प्रसाद पाचपांडे
अमरावती / नवी मुंबई

Sunday 3 July 2016

lost & found


lost & found नावाचा नवीन मराठी  चित्रपट येतोय एक नवीन विषय घेऊन
आता खरे तर लॉस्ट आणि फाऊंड असे या चित्रपटाचं नाव का ठेवलं असावं हा विचार मनात येतो , पण trailor पाहिल्यावर मग रोजची होणारी मुंबई करांची धावपळ ,त्याचं जीवन आणि त्या बदल्यात घरच्या पासून आणि आपल्या लोकां पासून दूर राहणाऱ्या लोकांमधे आलेला एकटे पणा आणि त्या गर्दी मध्ये तो माणूस कुठे तरी हरवून जातो एकटाच आणि त्यातून वाढत जाणार frustation आपल्या डोळ्यासमोरून जातो अगदी सिनेमाचा पहिला संवाद ऐकलं तरी लक्षात येईल , "जगात खूप एकटेपणा आहे , लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नसतो , थकवा आहे मानसिक त्रास आहे ".
आणि अश्याच या एकटे पण मध्ये अडकलेले 4 अनोळखी लोक एकत्र येतात , एकमेकांना आधार देतात आणि पुढे हेच 4 अनोळखी  लोक   समाजात हाच वाढत चाललेला एकटेपणा दूर करण्यासाठी एकत्र येऊन काम करायचा ठरवतात  आणि ते एक प्रोग्राम राबवतात anti loneliness प्रोग्राम म्हणजेच ALP आणि त्या अंतर्गत ते ठरवतात की आपण अश्या लोकांना भेटायचं जे स्वतःला एकटे समजत असतील आणि त्यांना सहानुभूती नाही तर एक उमेद द्यायची आणि त्यांचा मधली ती व्यक्ती शोधायची जी हरवली असते
मी समाजात फिरत असताना मला अनेक लोक भेटतात जे एकटे पडले आहे किंवा स्वतःला एकटे समजतात किंवा जे frustation मध्ये असतात , अगदी या लोकांमध्ये घरा पासून दूर असणारे , जॉब सर्च करणारे , प्रेमभंग झालेले किंवा एकटे राहणारे , ज्यांचे मूल दूर राहतात अश्या वेळी त्या लोकांशी आपण 2 शब्द जरी प्रेमाचे बोललो तरी ते त्यांना सुखावतात किंवा अश्या हरवलेल्या लोकांना त्यांचा मधील तो किंवा ती सापडतो .चित्रपटातील 2 ओळी अगदी मनाचा ठाव घेऊन जातात
"अनोळखी लोकच कधी कधी ओळखीची वाटतात
आणि खरंच कोणी तरी हवं असत ना बोलायला ".
आणि अश्यावेळी त्या लोकांनी सुद्धा स्वतःला एकटे समजण्या पेक्षा एखाद्या व्यक्तीला जवळच समजून आपली मनातली गोष्ट सांगावी , कदाचित त्याचा मधील किंवा तिच्या मधील त्या व्यक्तीला हरवलेली तो किंवा ती व्यक्ती भेटून जाईल
याच एकटे पणा वर आणि या चित्रपटाला dedicated माझ्या 4 ओळी
"तहानलेल्या पाखराला जशी पाण्याची आस असते
एकटेपणा मध्ये सुद्धा  तशी कोणाची साथ हवी असते
अश्यावेळी दोन शब्द मायेचे सुद्धा मनात घर करून जातात
प्रेमाची नवी पावली मनात घर करून जातात".
-प्रसाद पाचपांडे
अमरावती / नवी मुंबई

Friday 8 April 2016

व्याकूळ

तुझ्या त्या आठवणीने
आज सुद्धा व्याकूळ होतो मी
हरवलेल्या त्या शब्दांमध्ये
आज सुद्धा तुला शोधतो मी
पहाटेच्या त्या धुक्यांमध्ये
स्वप्न रंगवत होतो मी
रस्त्यावरील मृगजळाला
सत्य समाजात होतो मी
भावनेमध्ये अडकून
असा का गाफील होतो मी
जिंकायचे सोडून
पर्त्येक गोष्ट हरवत होतो मी
तुझ्या त्या आठवणीने
आज सुद्धा व्याकूळ होतो मी
हरवलेल्या त्या शब्दांमध्ये
आज सुद्धा तुला शोधतो मी
 कवी :- प्रसाद पाचपांडे
           अमरावती /नवी मुंबई