Sunday 20 November 2016

तुळशी चे लग्न


कधी काळच्या घराना
एक छोटे से आंगन असायचे
त्या छोट्याशा अंगनात
एक तुळशी वृंदावन असायचे
मग यायची दिवाळी
ज्याची सर्व आपुलकी नी वाट बघायचे
दिवाळी नंतर तुळशी चे लग्न असायचे
तुळशी च्या लग्ना साठी
शेजारी नातेवाईक एकत्र यायचे
त्या निमित्य फ़राळ व्हायचं
गोड़ धोढ़ व्हायच
मजा मस्करी व्हायची
लोकांमधल प्रेम जपल जायच
आता सर्वांच स्टैंडर्ड वाढल
स्टैंडर्ड वाढला म्हणुन
रहण देखील बदलल
घरा मधली लोक आता
अपार्टमेंट मधे राहायला लागली
पण आता त्या अपार्टमेंट मधे
माये ची लोक येत जात नाही
कारण घराला नसते आंगन
अंगनात नसते तुळस
आणि होत नाही तिथे
तुळशी चे लग्न
- कवि प्रसाद पाचपांडे