सुचलेले शब्द आणि मनातील विचार
Wednesday, 24 June 2026
प्रणित मोरे शो आणि अश्लील controvers
Wednesday, 3 March 2021
लॉकडाउन मधील एक हॉरर कथा
गणेश एका नामांकित संगणक कंपनी मध्ये काम करणारा मुलगा, फॉर्मल शर्ट, काळे शूझ घालून सकाळी ९ वाजता ऑफिस साठी निघणारा व रात्री ७-८ वाजता घरी येणार एक साधारण मुलगा, सकाळी रूम वरून निघाल्यावर मित्रांसोबत चहा पिणे आणि मग ऑफिस ला जाणे आणि ऑफिस वरून आल्यावर मित्रांसोबत रात्री जेवण करणे आणि webseries बघणे हा त्याचा नित्यक्रम.
२०२० च्या नवीन वर्षात नुकताच गणेश ने त्यांच्या संगणक कंपनी जवळ लाँच झालेल्या टाउनशिप मध्ये एक फ्लॅट घेतला, टाउनशिप नुकतीच लाँच झाल्याने त्या एरिया च्या आसपास तशी विरळ वस्तीच होती आणि काही थोडेफार दुकान , त्याला फेब्रुवारी च्या आसपास त्या फ्लॅट च possession देखील मिळालं, अनेकांना गणेश प्रमाणे possession मिळालं होता पण त्यातील काही लोक दुसरीकडे राहत होते तर काही लग्न झालेले असल्यामुळे मुहूर्त आणि वास्तुशांती करून येणार होते, गणेश मात्र बॅचलर आणि त्यात IT Engineer असल्यामुळे भाड्याचे पैसे उगाच देण्यापेक्षा स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहावं या उद्देश्याने राहायला आला.
गणेश चा स्वभाव हा कामापुरता बोलणारा असला तरी येता जात सोसायटी च्या चौकीदार, चहा वाला, दुकानदार यांच्याकडे पाहून हसणे आणि काय दादा वगैरे बोलणे या सर्व गोष्टीमुळे गणेश सर्वांच्या परिचयाचा झाला होता, काही दिवसांनी अचानक corona मुळे लागलेल्या लोकडोवन मुळे गणेशला घरूनच काम करावं लागत होता त्यामुळे ७ वाजेपर्यन्त काम करून गणेश संध्याकाळी खाली फिरायला यायला लागला होता त्यामुळे आजूबाजूचे काम करणारे देखील त्याच्या ओळखीचे झालेले, पण काही दिवसांनी लोकडोवन वाढल्यामुळे आजूबाजूचे दुकानदार देखील आता गावाला गेले होते आणि संध्याकाळी खाली फिरायला येनार गणेश हळूहळू खाली फिरायला यायचा देखील कमी झाला, फक्त जेवणासाठी आणि चहा पिण्यासाठी काम वाढल्यामुळे खाली यायचा, पुढे असेच दोन तीन महिन्यांनी जून जुलै मध्ये त्यांचं खाली येणे देखील बंद झालेलं आता रोज त्यांचा दबावाला यायचा किंवा swiggy वरून ऑर्डर आणि त्यांच्या फ्लॅटबाहेर ठेऊन जायचा, किंवा तो कधी ऑनलाईन रोजच्या गोष्टी ऑर्डर करायचा. फ्लॅट साफ करायला आलेला क्लिनर ला सुद्धा अथवा चौकीदार ला त्यांच्या फ्लॅटमधून त्यांच्या एकट्याच्या कधीतरी आवाज यायचा पण तो बाहेर निघत नव्हता, चौकीदार लोक आता विचार करायला लागले गणेश ची तब्येत तर खराब झाली नसेल ना कोणी म्हणायचं मुहूर्त न काढता घरात गेल्यामुळे त्याला वेड तर नसेल लागले ना.
असेच दिवस जात होते, ओक्टोम्बर, नोव्हेंबर, डिसेंबर लागला गणेश च खाली येणे जवळपास बंद झाले होते, एक दिवस दुपारी त्यांचा डबेवाला जो १२ वाजता डबा देऊन जायचा तो देखील नव्हता आला आणि ३ वाजले होते, गणेश देखील खाली उतरला नव्हता, चौकीदार काकांना आता गणेश ची चिंता वाटायला लागली त्यांनी न राहवून बाजूच्या एका मुलाला गणेश ला नाश्ता पाण्यासाठी काही हवाय का म्हणून विचारायला पाठवलं, लिफ्ट बंद असल्यामुळे तो मुलगा पायर्यांनी वर जात होता पण काही वेळाने अचानक ओरडत खाली आला, त्याला काय झाले म्हणून चौकीदार काका बघायला जाणार तेच एक समोरून अक्राळ विक्राळ दाढी आणि केस वाढलेला आणि जाडजूड झालेला एक मुलगा खाली येत होता, त्यांच्या वाढलेल्या दाढी आणि केस ला पाहूनच तो लहान मुलगा भिला असावा, थोडा स्पष्ट पहिला तर तो गणेशचं होता, लोकडोवन मध्ये ऑफिस च काम वाढल्यामुळे तो सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लॅपटॉप समोर बसायचा आणि रात्री च काम झालं कि लॅपटॉप बंद करायचा हाच त्याचा दिनक्रम, आज त्याचा डबा न आल्यामुळे मोठ्या कष्टाने सुटी मागून तो खाली उतरला होता.
(सदर घटना पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध असल्यास एक योगायोग समजावा )
:- प्रसाद पाचपांडे
Friday, 1 January 2021
सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद
Friday, 31 July 2020
लोकशाहिरांच्या साहित्यातले लोकमान्य
१ ऑगस्ट २०२०, महाराष्ट्राच्या साहित्यासाठी आणि इतिहासासाठी आजचा दिवस खूप वेगळा आहे , आज लोकमान्य टिळक यांची १०० वि पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०० वीजयंती, एक पत्रकार जहाल लेखक, गणितज्ञ, प्रखर राष्ट्रवादी, इंग्रजांनी ज्यांना भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख केला असे लोकमान्य तर दुसरे साहित्यरत्न लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलन मध्ये ज्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले असे अण्णा भाऊ साठे, एकाची जयंती तर एकाची पुण्यतिथी.
लोकमान्य टिळकांनी गीतेचा सार असणारा गीतारहस्य नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला तर अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा नावाची कादंबरी लिहिली.अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या ३ कवितांमध्ये लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केलाय
२) महाराष्ट्राची परंपरा
३) मुंबईचा गिरणी कामगार
याच निमित्याने अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचा गण या काव्यप्रकारात लोकमान्य टिळकांबद्दल त्यांचं महत्व सांगणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहे त्या या निमित्याने बघू या :-
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनी गातो कवणा ||धृ ||
स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना
लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना
कठीण काळी राष्ट्रनौकाना
मार्ग दाखविला तयाना
देशा दिली ज्यांनी प्रेरणा ||१||
- अण्णा भाऊ साठे
वरील गण या काव्यप्रकारात अण्णा भाऊ साठे सर्वात पहिले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीशिवछत्रपती यांचं स्मरण करून प्रथम मायभू चा चरणा,छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवणा म्हणजेच सर्वात पहिले मी माझी मायभूमी आणि छत्रपतींच्या शिवराय याना वंदन करतो आणि त्यांना स्मरण करून खालील गण सादर करतो .
त्यापुढील कडव्यात ते लोकमान्यांबद्दल लिहितात "स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना
लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना " कि मी छंत्रपती शिवरायांनंतर अश्या व्यक्तीला स्मरण करतो ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून सर्वसामान्य लोकांना जागे केले जेणेकरून येथील लोक हे इंगरांविरोधात स्वराज्यासाठी एकत्र येतील, पुढे ते लिहितात कि "कठीण काळी राष्ट्रनौकाना, मार्ग दाखविला तयाना " या देशात जेव्हा इंग्रजविरोधात कठीण काळ होता दडपशाही होती तेव्हा येथील राष्ट्रनौकाना म्हणजेच सर्वसामान्य लोकांना स्वराज्य हा मार्ग लोकमान्य टिळक यांनी दाखविला आणि देशाला इंग्रजनविरोधात लढण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली अशा लोकमान्य टिळक याना मी वंदन करतो, हे आहेत लोकशाहीर म्हणवल्या जाणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे लोकमान्य टिळक यांचा बद्दल चे शब्द, आज आपण सर्व महापुरुषांची विभागणी करतो अश्या वेळी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली हि गण कविता बराच काही सांगून जाते, जिथे आज फक्त जात पाहून महापुरुषांची जयंती साजरी केल्या अश्या आजचा महाराष्ट्राला आज या दोन्ही महापुरुषांची गरज आहे.
दुसरी कविता आहे मुंबईचा गिरणीकामगार त्यात त्यांनी लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर जी स्तिथी झाली त्याविषयी अण्णा भाऊ साठे यांनी वर्णन केलाय ते बघूया:-
सन एकोणीसशे आठ साली | इंग्रजांनी भली | अटक बघा केली | टिळकांना कारागृहीं नेले
मुंबईचा कामगार खवळे | निषेध संपाचे वादळ उठले | हिंदच्या मुक्तीचे भले ||
यामध्ये १९०८ साली लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर मुंबईचे गिरणी कसे खवळले आणि पुढे संप पुकारून त्यांनी निषेध व्यक्त केला हे सांगितलं आहे.
अण्णाभाऊ तिसऱ्यांदा एका पोवाड्यात लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला आहे
पोवाड्याचा नाव आहे :- महाराष्ट्राची परंपरा, त्यात ते खालील प्रकारे उल्लेख करतात
टिळकांनी घालून साद सिंह उठवला
उन्मत्त गोऱ्या गजाला, निर्भय इशारा दिला||
पळ काळे कर लवलाही केसरी आला’ ॥
यात अण्णा भाऊ साठे टिळकांना सिंह म्हणतात आणि त्यांनी इंग्रजांना ना भिता केसरी मधून जे लेख लिहायचे त्याचा उल्लेख अण्णाभाऊ यांनी केलाय, अण्णाभाऊ यांचा काळ वेगळा, दृष्टिकोन वेगळा तरीही ते लोकमान्य टिळकांचा त्यांनी आपल्या कवितांमध्ये अश्या प्रकारे उल्लेख केलाय , माणूस कितीही मोठा झाला तरी इतर व्यक्तींबद्दल असलेला आदरभाव च अण्णाभाऊ साठे यांच्या वरील कवितांमध्ये दिसून येतो, आज यांचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती तर लोकमान्य टिळक यांची १०० वी पुण्यतिथी त्यानिमित्यानी अण्णा भाऊ साठे यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल लिहिलेय या ओळी, दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन
प्रसाद पाचपांडे
अमरावती
Friday, 19 June 2020
मानसिक तणाव, आत्महत्या आणि जीवन
Friday, 20 April 2018
तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी
तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी
आज सुद्धा झुरतो मि
तुझ्या प्रत्येक हाके ची
वाट आज पाहतो मि
तुझ्या प्रत्येक हास्यात
गीत माझे शोधतो मि
तुझ्या प्रत्येक दुःखात
अश्रु माझे जपतो मी
चूक ती माझी होती
जी तुझ्यावर निघाली
पण आज पण त्या चुकीची
शिक्षा भोगतो मी
वेदने मधे हृदय माझे टूटत होते
फक्त तुझे मन राखण्याची
ते वाट पाहत होते
तुझ्या प्रत्येक शब्दाला
आज सुद्धा झुरतो मी
हरवलेल्या त्या आठवणी मध्ये
स्वतःला शोधतो मी
प्रसाद पाचपांडे
अमरावती/ नवी मुंबई
Wednesday, 11 April 2018
महात्मा फुले याना एक पत्र
आदरणीय महात्मा फुले याना विनम्र अभिवादन , आज तुम्हाला विचार आला असेल आज याला आपली आठवण कशी काय आली , तसं तुम्ही पाहत असालच इथे निवडणूक जवळ आल्या कि इथल्या लोकांना राजकारण्यांना तुमची आठवण येतेच कि कारण येथे तुमचं नाव घेतलं आणि तुमचा फोटो बॅनर ला लावला कि इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते ,तुमचं कार्य एवढा मोठं आहे कि आजसुद्धा तुमचा नावाचा वापर करून इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते, आज या पात्राच्या निमित्याने या काही भावना तुमच्या पर्यंत पोहचवत आहे
महात्मा फुले आम्हाला माफ करा
तुम्ही इथे गोर गरीब लोकांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक शाळा उघडल्या पण आज इथे तुमचा नावानी अनेकांनी इथे मोठ्या शाळा आणि शिक्षण संस्था उघडल्या आणि त्याच संस्थेमधून भरमसाठ फी आकारानं सुरु आहे ,अगदीच काय इथे शिक्षणाचं बाजारीकरण सुरु आहे.
तुम्ही ज्या भिडे वाडा मध्ये मुलीची पहिली शाळा सुरु केली त्याची अवस्था फार दयनीय झाली आहे , इथल्या राजकारण्यांना तुमचा नावाचे मोठे बॅनर लावायला वेळ आहे पण भिडे वाड्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही .
तुम्ही स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिली मुख्यध्यापिका बनवून समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला होता पण आज सुद्धा तुमचं नाव घेणारे लोक एकीकडे स्वतःच्या घरच्या स्त्रीला मात्र पदर घेऊन किंवा बुरखा घालून चौकटी च्या आतच ठेवतात , अनेकांच्या घरी आज सुद्धा मुलगा आणि मुलीच्या शिक्षण मध्ये तफावत पाहायला मिळते.
मुलींसाठी तुम्ही इथे ठिकठिकाणी शाळा उघडल्या , स्त्रियांना पुरुषांप्रमाणे शिक्षण मिळावं , समानता मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत , आमच्या साठी तुम्ही पहिले स्त्रीवादी म्हणजे फेमिनिस्ट व्यक्ती आहेत , आज मात्र इथे फेमिनीसम ची अख्खी व्याख्या च इथल्या फेमिनिस्ट लोकांनी बदलून टाकली आहे .
तुम्ही शिवरायांचं पोवाडा लिहिला पण आज तुमचा पूर्ण पोवाडा न वाचता एका शब्दावरून निष्कर्ष काढणारे अनेक लोक आहेत.
तुमचं नाव घेऊन काही लोक इथे द्वेष पसरवण्याचं सुद्धा काम करतात पण कदाचित ते हे विसरले कि ज्यांचा विरुद्ध ते द्वेष पसरवत त्याच समाजातील मुलगा तुम्ही दत्तक घेतला होता .
अजून सुद्धा बरंच काही सांगायचं पण तूर्तास एवढंच , शेवटी एवढंच सांगावं वाटते तुमचा नावाचा लोकांनी फक्त राजकारण पुरता न करता तुमचं शिक्षणाचं कार्य पुढे नेण्याकरिता अखंड करावा
तुमच्याच महाराष्ट्रातील एक तरुण





